पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव येथे बिबट्याचा वावर - पंधरवड्यात दोन पाळीव जनावरे फस्त , शीघ्र कृती दलाने घेतला आढावा.

कोरोनामुळे अगोदरच जनता भयभीत असतांना पैठण तालुक्यातील मुलानी वडगाव शेतशिवारांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असल्याने शेतकरी वर्गात दहशत निर्माण झालेली होती.


परंतु  सदरची माहिती  प्राप्त होताच  प्रसंगावधान राखत  वनपरिक्षेत्र  औरंगाबाद  प्रा. येथील  वनाधिकारी वन कर्मचारी  यांनी शीघ्र कृती दल सह तात्काळ  घटनास्थळी पाचारण केले. याबाबत अधिक वृत्त असे की , दिनांक ८ऑगस्ट २०२०  रोजी  सकाळी मुलानी वडगाव  येथील शेतकरी कृष्णा शिरवत यांच्या मालकी शेतात  हिंस्त्र वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बकरी ठार झाली असून बिबट्याचे भीतीने गावकरी भयभीत असल्याची वार्ता मिळताच तात्काळ  अरुण पाटील सहाय्यक वनसंरक्षक औरंगाबाद प्रा, सचिन शिंदे सहाय्यक वनसंरक्षक कन्नड तथा शीघ्र कृती दल प्रमुख  यांचे मार्गदर्शनाखाली  एस. बी.  तांबे,वनपरिक्षेत्र अधिकारी  औरंगाबाद प्रा.,मनोज कांबळे 
वनपरिमंडळ अधिकारी तथा शीघ्र कृती दल सदस्य  यांचेसह  या दलाचे सदस्य  वनरक्षक विश्वास साळवे, राजेंद्र जाधव  व  आदि गुडे  वन्यजीव अभ्यासक ,वन्यजीव प्रेमी श्रीकांत  वाहुळ यांच्या  चमूने बिबट्याच्या पायाचे ठसे जागोजागी मागोवा घेत आजूबाजूच्या संपूर्ण परिसर फिरस्ती करीत असताना साधारणत: एक किलोमीटर अंतरावर बिबट्याचे पंजाचे स्पष्ट ठसे प्लास्टर ऑफ पॅरिस ने घेतले. ▪__तद्नंतर सदरचा हिंस्र वन्यप्राणी बिबटच असल्याचे निष्पन्न झाले. ▪
शीघ्र कृती दलाचे जवान यांनी बिबटयाचे पगमार्क चा अभ्यास करून  तो नेमक्या कोणत्या मार्गाने येतो आणि कुठे जातो याचा शोध घेऊन  कॅमेरा ट्रॅप, 2 डिजिटल कॅमेरे  लावण्यात आले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी शक्य त्या सर्वच उपायाचा अवलंब वनविभाग करीत आहे.
 ▪ आडूळ वनाधिकारींनी घेतला बिबट्या मानव संघर्ष बाबत जनजागृतीपर कार्यक्रम 
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी मौजे मुलानी वाडगाव जिल्हा परिषद शाळा येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी ग्रामस्थांना मनोज कांबळे , शीघ्र कृती दलाचे सदस्य तथा वन परिमंडळ अधिकारी आडुळ यांनी बिबट वन्य प्राणी विषयी ती भीती दूर करताना मार्गदर्शन केले की,
बिबट्या हा  मानवी वस्तीकडे येणे, शेतात लपून बसणे, गावातील शेळ्या, तसेच मेंढ्या/बकरीची शिकार करणे, धुमाकूळ घालणे असे अनेक प्रकार अलीकडच्या  काळात सातत्याने होत आहेत, तसेच बिबट्यांचा अधिवास नष्ट होणे यांसारख्या प्रकारांमुळे बिबट्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. यामुळेच बिबटे सैरभैर होताना दिसतात. याचा फटका थेट मानवी शेतीवस्तीत बसत आहे. ही बाब ओळखून वन्यजीव  अभ्यासक आदि गुडे यांनी तयार केलेली फिल्म, संकलीत माहितीपटाद्वारे एलसीडी प्रोजेक्टर, लॅपटॉप याद्वारे ही फिल्म दाखविण्यात  आली. त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसादही लाभला ,पुढे माहिती देताना आदि गुडे म्हणाले की, बिबट्यांचा वावर असलेल्या आणि बिबट्या-मानव संघर्ष निर्माण होणाऱ्या भागात जनजागृतीची ही मोहीम राबविणे अत्यावश्यक आहे.  सदर प्रकरणी वनकर्मचारी यांचेसह सरपंच सतीश शेळके,पोलीस पाटील रंगनाथ काळे  ,सुदाम शिरवत ज्ञानेश्वर उघडे ,कृष्णा मिसाळ शेषराव शिरवत, वाल्मीक दुबिले ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
 ▪. बिबट्या आपल्या वस्तीकडे का येतो ? त्याला परावृत्त करण्यासाठी काय करावे ?
बिबट्या मानवी वस्तीकडे सहज खाद्याच्या शोधार्थ येतो. यामध्ये कुत्री-मांजरांपासून शेळ्या-मेढ्यांचा समावेश आहे. त्यामुळे बिबट्या आपल्या वस्तीकडे येण्यापासून मज्जाव करण्याकरिता ग्रामस्थांनी काही उपाययोजना आखणे आवश्यक आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त गोठा किंवा पिंजरा तयार करावा. जेणेकरुन त्याला भक्ष सहजपणे मिळणार नाही. असे केल्यास बिबट्याला आपण केलेल्या या कृतीची जाणीव होते. त्याला खाद्य मिळणे बंद झाल्याने काही दिवसांमध्ये तो वस्तीकडे येणे बंद करतो. ©अमन