वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी येथील शाळेत स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुनिल चिपाटे, सचिन वाघ, डॉ हरिशचंद्र रामटेके, पदमसेना नागदेवे, अनिता राठोड, विद्या सोनोने, रिता मार्कण्डे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले.
डॉ. हरिशचंद्र रामटेके यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सादर करीत असताना सांगितले की, सावित्रीबाई फुले यांचे नाव भारतातील व महाराष्ट्रीयन माणूस कधीच विसरणार नाही कारण ज्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणे म्हणजे पाप समजले जात होते, अशा काळात शैक्षणिक, सामाजिक, अंधश्रद्धा, रुढी परंपरागत समजुतीने ग्रासलेल्या समाजास प्रबोधन करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १ जानेवारी १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा काढून नंतर अनेक शाळा व वसतिगृह चालविले, सावित्रीबाई फुले ह्या केवळ शिक्षिकाच होत्या असे नव्हे तर त्या पती ज्योतिबाच्या सर्व आंदोलनात साथ देणाऱ्या एक कृतिशील कार्यकर्त्या, समाजसेविका होत्या असे उदबोधन प्रबोधन करतांना डॉ. हरिशचंद्र रामटेके यांनी सांगितले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या पायल गाडेकर, दीक्षा चित्ते, अंजली गायकवाड, प्राजक्ता दांडगे,यांना पुस्तक व गुलाब पुष्प देऊन अध्यक्ष ज्ञानेश्वर साळे, मुख्याध्यापक सुनील चिपाटे, सचिन वाघ यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. हरिशचंद्र रामटेके यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व उत्साह पूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला.
        राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त वाळूज महानगर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न !!!


                       रांजणगाव (शे.पू.) येथिल राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त भय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून  संस्थेचे सचिव श्री. किसन नामदेव  शिंदे, व प्रमुख पाहुणे म्हणून  पंचायत समिती सदस्य दीपक भाऊ बडे, शाळा व्यवस्थापन समिति च्या अध्यक्षा सौ. सीताबाई तायडे उपस्थित होत्या तर प्रमुख मान्यवर म्हणून  संस्थेचे  सहसचिव श्री संजय दारवंटे, संस्थेच्याअध्यक्षा सौ. ताराबाई शिंदे  संस्थेच्या सदस्या सौ. ज्योति दारवंटे, संस्थेचे  कोषाध्यक्ष श्री गणेश पवार, शारदाताई कोथिंबीरे,  आर्मी पोलीस कॅप्टन रुचिका जैन,जयश्री म्हस्के, जयश्री पाटील,  अनिल देवरे, प्राथमिक मुख्याध्यापक श्री मुकुंद तेलप, माध्यमिक मुख्याध्यापक श्री गोविंद इंगळे, शाळा व्यवस्थापन समिति च्या अध्यक्षा सौ. सीताबाई तायडे, उपाध्यक्षा सौ, सुवर्णा तांगडे,  आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी  शिंदे के. एन. यांच्या हस्ते,  दिव्य मराठी चे ब्युरो चीफ संतोष उगले यांच्या हस्ते    प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून   कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  
          यावेळी विविध शाळेतील  ७०  विद्यार्थ्यांनी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला होता यामध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक शांताई प्राथमिक विद्यालय,बजाज नगर चा विद्यार्थी चि. शेवाळे शुभम परमेश्वर, द्वितीय क्रमांक ऑर्चीड इंग्लिश स्कुल बजाज नगर चा विद्यार्थी आदमने शिवराज ज्ञानेश्व, तृतीय क्रमांक स्वामी विवेकानंद नशनल स्कुल, बजाज नगर चा विद्यार्थी  खोचे प्रमोद दत्तात्रय व उत्तेजनार्थ स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कु. नरोडे शिवानी आन्ना पटकावले. तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक कै. हौसाबाई शिंदे माध्यमिक विद्यालय रांजणगाव ची विद्यार्थिनी कु. शेख आयशा लियाकत, द्वितीय क्रमांक न्यू शहीद भगतसिंह विद्यालय रांजणगाव ची कु. दामले दीक्षा प्रकाश, तृतीय क्रमांक राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळा रांजणगाव ची विद्यार्थिनी कु. डोंबे पूनम लक्ष्मन, उत्तेजनार्थ क्रमांक श्री शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कांबळे साक्षी सुर्यकांत आदी विद्यार्थ्यांनी क्रमशा क्रमांक पटकावले. यावेळी संस्थेचे सचिव श्री किसन शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
                                  या कार्याक्रमाचे परीक्षण  दिव्य मराठी चे ब्युरो चीफ मा. श्री संतोष उगले ,  श्री, पाटील डी. एन., श्री चक्रधर डाके, किरण निकम, मिलिंद भालेराव आदि मान्यवरांनी केले. 
                                             या कार्यक्रमासाठी  सूत्रसंचालन कुमार बिरदवडे  यांनी केले  तर प्रमुख मान्यवरांचे आभार अमोल तेलप   यांनी मानले. यावेळी दिगंबर क्षिरसागर , नरवडे शुभांगी, सरला गवळी, मनीषा घट्टे, दिलीप फरकाडे, जाधव ज्ञानेश्वर,  पवार पुंडलिक,  समाधान निकम , अशोक धनगर, शिंदे गोकुळ, विद्याभूषण कलावंत, तगरे रेखा, गीतांजली महालकर,  सारिका खंदारे  आहेर  जिजा, नेहा साळवे, पूजा जीवरख, आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.